अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी

कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. काल कुडाळ शिवसेना देखील या विरोधात आक्रमक झाली असून अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी, शहरप्रमुख रोहित भोगटे, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, बंटी तुळसकर, महिला तालुकाप्रमुख रचना नेरूरकर, शिल्पा शिरसाट, माजी पंचायत समिति सदस्य संदेश नाईक,नगरसेविका श्रुति वर्दम, चांदनी कांबळी, चेतन पडते, मंगेश चव्हाण, सागर वालावलकर, प्रसन्ना गंगावणे,चंदन कांबळी, योगेश काळप व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!