मंत्री नितेश राणे यांनी घेतला अबू आझमींचा समाचार

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी अबू आझमीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान “औरंगजेब एक उत्तम शासक होता. त्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थान पर्यंत पसरल्या होत्या. तसेच त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४ % एवढा होता. शिवाय त्याच्याच काळात भारताला सोनेकी चिडिया म्हटले जायचे” अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!