तिलारी घाट रस्ता दुरुस्ती काम संशयायाच्या भोवऱ्यात

पुरेशी यंत्रणा नाही तीन कामगार घेऊन काम

जाळीत दगड पिचिंग दगड मापात नाही संबंधित अधिकारी यांचे दूर्लक्ष

दोडामार्ग : तिलारी घाट रस्ता हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो यामुळे धोकादायक घाटात धोकादायक अपघात प्रवणक्षेञ तीव्र चढ उतार अशा ठिकाणी तशा पध्दतीने जोखीम घेऊन काम करायला पाहिजे. पण तिलारी घाट वाहतूक बंद करून संरक्षण कठडा भाग खचला तो संपूर्ण रस्ता खोदून या ठिकाणी काम सुरू केले आहे. पण एकंदर कामाचा दर्जा संशयास्पद आहे.

जवळपास पंधरा ते वीस फूट खोदकाम करून जाळी अंथरून दगड पिचिंग केले जात आहे. यासाठी योग्य मापातील दगड नाही. शिवाय कामगार नाही तीन कामगार घेऊन काम केले जात आहे. या ठिकाणी बांधकाम विभाग चंदगड वरिष्ठ अधिकारी देखील नाही. तेव्हा सदर दुरुस्ती कामाबद्दल अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. आणि ठराविक वेळेत काम सुरू होईल असे वाटत नाही.

गोवा दोडामार्ग, तिलारी घाट मार्गे बेळगाव, कोल्हापूर, जवळचा मार्ग या मार्गावर दरदिवशी शेकडो वाहने ये जा करतात. याच तिलारी घाटातून अवजड वाहने वाहतूक देखील सुरू असायची यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे घाट रस्ता पावसाळ्यात संरक्षण कठडा खचला होता यामुळे सात महिने या घाटातील एस टी बस सेवा बंद आहे.

तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती बाबत सरपंच संघटना दोडामार्ग सिंधुदुर्ग, कोदाळी सरपंच यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती टेंडर काढले. होते. काम सुरू करण्यासाठी घाटातील वाहतूक बंद केली गेली आहे.

तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. पण या धोकादायक ठिकाणी दुरुस्ती करताना आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. खाली सिमेंट काँक्रिट टाकले पण योग्य प्रकारे पाणी मारलेले नाही. यावर जाळी बांधून दगड पिचिंग केले जात आहे. यासाठी जाळीचे कप्पे तयार केले जात आहेत पण या ठिकाणी हा त्या त्या मापातील पाहिजे. तसे दिसत नाही. जाळीच्या बाजूला फक्त मोठे दगड लावून पिचिंग केले जात आहे. पण मध्यभागी लहान दगड खडी टाकून संपूर्ण काम संशयास्पद केले जात आहे. या ठिकाणी कामगार देखील नाही तीन कामगार आहेत. पुरेशी यंत्रणा संबंधित ठेकेदाराकडे नाही. तो साईटवर देखील दिसून आला नाही.

तिलारी घाट हा धोकादायक आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे. तो भाग अपघात क्षेत्र आहे. आणि अशा ठिकाणी दुरुस्ती काम योग्य केले जात नाही तेव्हा संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदाराकडून योग्य प्रकारे काम होईल याची दक्षता घ्यावी. संत गतीने काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण फेब्रुवारी महिना घाट बंद राहणार आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील अनेक भक्तांची महाशिवरात्री उत्सव तेरवण मेढे या ठिकाणी येणे कठीण जाणार आहे.

हजारो नागरिक वाहन धारक यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा बांधकाम विभाग कोल्हापूर यांनी दुरुस्ती कामात जातीनीशी लक्ष घालावे. अशी मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!