मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभाल करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या घोषणा केल्या आहेत.काय आहेत नव्या घोषणा जाणून घ्या:
■ मृद व जलसंधारण विभागाचे नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेसोबत सामंजस्य करार
■ राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ
■ जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
■ कमी खर्चात अधिक काम पूर्ण होणार, जलसंधारणाचा प्रभावी वापर होणार
■ ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत २३ जिल्ह्यांमधील किमान १००० जलाशयांची साठवण क्षमता वाढविणार
■ यासाठी नाम फाउंडेशन प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी संस्था तर टाटा मोटर्स या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन करणार
■ पाण्याच्या विषयावर राज्यात जनजागृती करण्यासाठी भारतीय जैन संघटना राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती करणार
■ महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) संस्थेसोबत मृद व जलसंधारणाची कामांचे मॅपिंग व पडताळणी करण्यासाठी सामंजस्य करार.