कुडाळ : पणदूर येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील पथदिवे बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर बसवून देत अवघ्या २४ तासांच्या आत प्रश्न निकाली काढला. त्यामुळे आ. निलेश राणे म्हणजे क्विक ॲक्शन अँड क्विक रिझल्ट हे सिद्ध झाले आहे.
पणदूर येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील पथदिवे बंद स्थितीत होते. त्यामुळे वाहन चालकांना व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांना याबाबत सूचना केल्या. त्यानंतर आनंद शिरवलकर, निखिल कांदळगावकर, प्रकाश पावसकर यांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवण्याची व्यवस्था केली. आणि तात्पुरत्या स्वरूपात पथदिवे सुरू करण्यात आले.
आजच्या दिवशी तर जनरेटरवर पथदिवे सुरू करण्यात आले खरे पण पुढील दिवसांचं काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच होता. या प्रश्नाचे उत्तर देखील आमदार निलेश राणे यांनी स्वतः शोधले. दुसऱ्या दिवशी आमदार निलेश राणे यांनी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर बसवून देत हा प्रश्न कायमचा निकाली काढला. अवघ्या २४ तासांच्या आत ट्रान्सफॉर्मर बदलून ग्रामस्थांना अंधारातून बाहेर काढणारी महाराष्ट्रातील एकमेव घटना असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी म्हटले. अवघ्या काही तासांत ग्रामस्थांची अडचण दूर केल्यामुळे आमदार निलेश राणे म्हणजे क्विक ॲक्शन अँड क्विक रिझल्ट हे समीकरण तयार झाले आहे.













