मालवण : शहरासाठीच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ पार पडला. सण १९९० साली पहिल्यांदा सन्मा. श्री. नारायणराव राणे साहेबांनी धामापूर येथून मालवण शहरासाठीच्या पाणी उपलब्ध करून देत मालवण शहराची पाण्याची गरज भागवली होती. त्यानंतर वेगाने विस्तारत गेलेलं मालवण शहर आणि वाढत पर्यटन यामुळे शहराची पाण्याची गरज वाढली. ही गरज लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आणि एकूण ४६ कोटी रुपये खर्चून मालवण शहरासाठी होणाऱ्या नवीन नळपाणी योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी मालवण मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे, श्री. दत्ता सामंत, श्री. संजय आंग्रे, श्री. सुदेश आचरेकर, श्री. महेश कांदळकर, श्री. दीपक पाटकर, श्री. अशोक सावंत आदी उपस्थित होते.