राजन साळवी यांनी केला खुलासा
राजापूर: कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी आमदार राजन साळवी भाजपा मधे प्रवेश करणार का या प्रश्नाची.राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेमुळे राजकीय वातावरनात मात्र चर्चांना उधाण आलं .राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे तेच जर भाजपा मधे गेले तर कोकणातील उबाठा पक्षाचे अस्तित्व कायम राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणारे होते.दरम्यान आज स्वतः राजन साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन या बद्दल माहिती दिली आहे. “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत” असं राजन साळवी म्हणाले. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले.”पराभवाची खंत आहे. पणी मी नाराज नाही. भाजपत प्रवेश करणार या अफवा आहेत” असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.
भाजपकडून ऑफर आहे का?
या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”निवडून आलेले आमदार शिंदे गटात जाणार का?शिवसेना शिंदे गटाचे आबिटकर म्हणाले, की राजन साळवी येणार असतील, तर स्वागत आहे. यावर साळवी म्हणाले की, “पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाच स्वागत करण्याची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्याने काम केलय. त्या भावनेने ते बोलत असतील” उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार, माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. या प्रश्नाव राजन साळवी म्हणाले की, “ते त्यांचं व्यक्तीगत मत असेल. मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे”