..तर कोकणात नाणार प्रकल्प होणार

खा.नारायण राणे यांचे वक्तव्य

पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते

रत्नागिरी: कोकणात सद्ध्या रिफायनरी प्रकल्पावरून वादात्मक वातावरण सुरू आहे.त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी इथे नारायण राणे यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येत आहे.काही महिन्यापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते की रिफायनरी जबरदस्तीने लोकांवर लादली जाणार नाही.स्थानिक लोकांचा विरोध असल्यास बारसू रिफायनरी प्रकल्प होणार नाही .दरम्यान आता माजी मंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकलपा बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे

कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. कारण कोकणातले भाजप नेते हे राज्यातील सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा साठी सक्रिय झाले आहे. नाणार रिफायनरी समर्थक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राणे यांचं विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.

error: Content is protected !!