मुंबई ,ठाणे ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार

ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उद्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!