गेल्या 30 वर्षांपासूनचे सत्ताधारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाढत्या जीडीपीवर भाष्य करणाऱे यबाबत गप्प का -मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.
सन 2024 या पूर्ण वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास४७९ जणांनी आपले जीवन संपविले. याची कारणे अनेक असली तरी या आत्महत्यांच्या कारणांमध्ये मोठा टक्का नोकरी नसल्यामुळे बेरोजगारी व उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात अनेक जणांना मोठ्या अपेक्षेने संधी देऊन पाहिल्यात. परंतु आज तगायत कोणीही इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. किंवा शाश्वत असे उद्योगधंदेही आणू शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जीडीपीचा टक्का नेहमी वाढतच असल्याचे केंद्रीय माजी सूक्ष्म व लघुउद्योग व राज्याचे महसूल तथा उद्योग मंत्री राहिलेले नारायण राणे नेहमी सांगतात मग असे असताना सुद्धा जिल्ह्यात ही परिस्थिती का ? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि उद्योग मंत्री ज्याप्रकारे तीन पैकी दोन आमदार यांच्या पक्षाचे असतानाही पक्षवाढीसाठी वारंवार बैठक घेताना दिसत आहेत. तसे उद्योगमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग धंदे आणण्याकरिता एकही बैठक घेताना दिसत नाहीत ही मोठी खंत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची घोषणा केली मुळात जिल्ह्यातील विमानतळ नेमकं न चालण्याचे कारण काय हे शोधण्याची गरज आहे. नुसता निधी खर्चून सुशोभीकरण करून चिपी विमानतळ चालणार नाही. तर जिल्ह्यात मोठ मोठे उद्योगधंदे आणल्यास व पर्यटन स्थळांचा शाश्वत विकास केल्यास विमानतळ चालणे शक्य होईल.
त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या बेरोजगारी, उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी यामुळे आर्थिक नैराश्येतुन होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून प्रतिनिधित्व करत असताना प्रामाणिक उपाययोजना करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.













