छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ब्युरो न्यूज: छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी 395वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी मोठं भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले शिवरायांचे किल्ले कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

error: Content is protected !!