ठाकरेंचा कोकणातील आणखी एक बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर ?

रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला होता. अशातच आता भास्कर जाधव शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मला योग्य संधी मिळाली नाही, आज माझा वाढतं वय आहे. मला दुःख आहे, योग्य वेळेला मला जर संधी मिळाली असती तर हा भास्कर नावाप्रमाणे महाराष्ट्राला भास्कर दिसला असता, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सुचक इशारा दिला आहे. पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहे? पलीकडे जाऊन काय फायदा आहे ? जे कोण पक्ष सोडून जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे त्याची आपल्याला गरज आहे का? आता तिकडे एवढी एसटी फुल झाली आहे तिथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

error: Content is protected !!