मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान:व्हिडिओ व्हायरल
ब्युरो न्यूज: सध्या मनोरंजन क्षेत्रात आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपटाच्या ट्रेलर मधे दाखवलेल्या लेझिम नृत्याची. यातील काही दृष्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.दरम्यान आता अजून एक वादत्मक बाब समोर आली आहे ती म्हणजे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी बोललेल्या वादग्रस्त विधानाची.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेता किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्या अभिनयाइतकेच किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राजकारण, समाजकारण तसेच मराठी चित्रपट जगतातील घडामोडींवर ते परखडपणे मत व्यक्त करतात. सध्या अभिनेते किरण माने यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यामध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत.
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
‘छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले… असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे.स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची खूनही आहे. त्यामुळे गोष्टीरुपात आलं की रंजकता येते आणि रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो, असंही राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले. मु.पो. मनोरंजन या पेजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये त्यांनी हा देवा केला असून यावरुनच किरण मानेंनी संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता किरण माने यांची सडकून टीका
असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणार्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले. अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का??? कडेकोट बंदोबस्तात तुरूंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते इव्हिएम घोटाळ्यानं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय? अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.













