मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करण्याच आवाहन देखील सरकारकडून करण्यात येत आहे.मात्र, एक दोन नव्हे तर तब्बल 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती एका वृत्त वाहिनीने दिली दिले आहे.अपात्र 30 लाख लाडक्या बहिणींना सरकारकडून तब्बल तीन हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे देखील म्हटले आहे. आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा आधीच लाभ घेतला असताना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, अपात्र 30 लाख लाडक्या बहिणींमधील बहुतांश महिलांनी आधीच एका योजनेचा लाभ घेतला असताना पुन्हा या योजनेचा घेतल्याचे समोर आले आहे.