वक्फ बोर्डाने सांगितलेला दावा हाणून पाडू

सर्व हिंदूंनी एकजुटता दाखवावी; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

वारकरी संप्रदायाची हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तर राज्यातही आता महायुतीचे शासन आले आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंनी आता बिलकुल न घाबरता धर्म रक्षणासाठी पुढे यावे. नांदुरी येथील सप्तशृंगी गडाच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला असला तरी तो हाणून पाडण्यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट दाखवावी, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.बागलाण तालुक्यातील चिराई येथे सोमवारी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्वावर सडेतोडपणे भाष्य केले. राणे पुढे म्हणाले, सर्व हिंदूंनी जागरूक राहून मुस्लीम धर्मियांकडून होणाऱ्या धर्मांध गोष्टींना प्रखरपणे विरोध केला पाहिजे. हिंदू धर्मीय आपापसात भांडतात. मुस्लिम मात्र धर्माच्या नावाखाली सर्व अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येतात. त्या पद्धतीने हिंदूंनीदेखील एकत्र येण्याची गरज असून, २०४७ पर्यंत भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचा डाव हाणून पाडा असेही राणे यावेळी म्हणाले. तसेच वारकरी संप्रदायाबद्दल गौरवोद्गार काढून वारकरी संप्रदाय हा हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!