केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण
ब्युरो न्यूज: कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान यावर संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी 10 डिसेंबर रोजी राज्यसभेत सांगितलं की, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासातून हे सिद्ध झालंय की, कोरोना लस भारतातील तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही. या उलट त्याचा धोका क झाला आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती वरिष्ठ सभागृहाला दिलीये.
तरूणांमध्ये मृत्यूचं कारणजेपी नड्डा म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे ज्यांना यापूर्वी रुग्णालयात दाखल होणं, अचानक मृत्यूची फॅमिली हिस्ट्री आणि काही जीवनशैलीमुळे अचानक मृत्यूचा धोका वाढला नड्डा यांनी सांगितलं की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या वर्षी मे-ऑगस्ट दरम्यान १९ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ रुग्णालयांमध्ये एक अभ्यास करण्यात आला.ते म्हणाले की, या अभ्यासामध्ये एकूण 729 आकस्मिक मृत्यूची प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये असं आढळून आलेलं की, कोरोना व्हायरस लसीचा कोणताही डोस घेतल्याने अचानक मृत्यूचा धोका कमी होतो. कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्याने अशा मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
ही औषधं क्वालिटी चेकमध्ये ठरली फेल
आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लेखी उत्तरात माहिती दिलीये की, हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड (Hindustan Antibiotic Limited) आणि कर्नाटक एंटीबायोटिक एंड फार्मास्युटिकल्स (Karnataka Antibiotic and Pharmaceuticals Limited) लिमिटेड द्वारे तयार करण्यात आलेली मेट्रोनिडाझोल 400 आणि पॅरासिटामोल 500 एमजी ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ असल्याचं दिसून आलं आहे.