महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वीजबिलाची थकबाकी भरा,अन्यथा…

मुंबई प्रतिनिधी: महावितरण कडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.मात्र जर वेळेत बिल भरले नाही तर थकबाकीदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे, त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जागामालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई मात्र होऊ शकते. अभय योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे.

error: Content is protected !!