मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला याला लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याची चर्चा आहे.लाडकी बहिण योजनेचा या विजयात महत्वाचं वाटा आहे.दरम्यान महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे. ‘लाडकी बहिण’ योजना सुरु राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी सानंदात्ती तात सारे मात्र या योजनेत्त्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते, तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही योजना सुरु ठेवताना सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे. या रक्कमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
काय बदलणार?
सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही. मात्र, आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेते बदल केले जाणार आहेत.
सध्याचे निकष काय?
1 जुलै पासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत.














 
	

 Subscribe
Subscribe









