“हा ” घाट राहणार १५ दिवस बंद
कुडाळ प्रतिनिधी: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलादपुरजवळ भोगाव याठिकाणी पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बोगद्यातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा बोगदा मागील वर्षी गणपतीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता
कशेडी बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे ही वाहतूक सध्या जुन्या घाट मार्गावरून वळवण्यात आली आहे. जुन्या घाट मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितलं. कशेडी बोगदा बंद करण्यात आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्ग पाहूनच प्रवास करावा.