अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातात २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागले. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केले. त्यामुळे लखनऊपर्यंतचा पूर्ण प्रवासात १७२ प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केला.
गोव्यातून इंडिगो कंपनीचे ६ई ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागले. विमान कोसळणार की या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.