सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ३८० सेल्सियस तापमानापर्यंतची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसात जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण ४०० सेल्सियस होणार असल्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे
तसेच वातावरणात दमटपणा दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे आंबा, काजू उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. या तीव्र उन्हाळ्यामुळे पाणी पातळी वेगाने घटत असून जिल्ह्यात टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्याच बरोबर या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा, काजू, नारळ, सुपारी या बागायती पिकांबरोबरच जांभूळ, करवंद यासारख्या रानमेव्यालाही बसणार आहे. तीव्र उष्णतेमुळे फळगळतीचे प्रमाण वाढले असून आंबा, काजूची फळे कच्च्या अवस्थेतच जळून काळी पडत आहेत. यामुळे आंबा, काजू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.