रत्नागिरी: राजकीय वर्तुळात राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आणि त्यानंतर सामंत बंधूंचा विरोध अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत.मात्र त्यानंतर राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला देखील आणि सामंत बांधुनी याला पाठिंबा दिला देखील.आता चर्चा आहे ती किरण सामंत यांनी बोललेल्या वक्तव्याची खासदारकी (लोकसभेची निवडणूक) लढवायची होती. असं वक्तव्य राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले राजन साळवी?
किरण सामंत म्हणाले. “मला राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देखील मिळालं होतं. मात्र मी लोकसभेवर ठाम होतो”. राजापूरातील एका कार्यक्रमात किरण सामंत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले. “रत्नागिरीमधील भविष्यातील निवडणुका या राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला (ठाकरे) जय महाराष्ट्र करत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. पक्षांतरानंतर ते पहिल्यांदाच राजापूरमधील सार्वजनिक यावेळी येथील विद्यमान आमदार किरण सामंत देखील मंचावर उपस्थित होते. सामंत यांनी साळवी यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच ते म्हणाले, “मी खासदार, उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आणि तुम्ही (राजन साळवी) राजापूरचे आमदार ठरलं होतं. मात्र साळवी यांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही. हरकत नाही, आता एकत्र मिळून मतदारसंघाचा विकास करू”.
मला राज्यसभेबाबतही आश्वासन देण्यात आलं होतं
किरण सामंत म्हणाले, “आम्ही (शिंदेंची शिवसेना) त्यावेळी राजन साळवी यांना म्हटलं होतं की साथ द्या. परंतु, ते त्यावेळी ऐकले नाहीत. मला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्याचबरोबर मला राज्यसभेबाबतही आश्वासन देण्यात आलं होतं. पण ते जाऊ द्या, झालं ते झालं. आता आम्ही आमदार आहोत. तुम्ही सर्वजण आमदार आहात. आपण सर्वजण मिळून आपल्या मतदारसंघाचा विकास करू”.
पक्षात सारं काही आलबेल आहे असा संदेश देण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी आज राजापुरात राजन साळवी यांचं स्वागत केलं. तसेच आगामी काळात पक्षासाठी एकत्र काम करण्याची भूमिका जाहीर केली.













