मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना विसर पडला की काय ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यानिबकेला आहे.
काही दिवसांपूर्वी ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तसेच दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिथे भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही त्या ठिकाणी विकास निधी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते.आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून निपक्षपाती राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या घेतलेल्या शपथीचा विसर पडलेला दिसतोय बरं . मंत्री नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मान्य आहे का ? एरवी दिपक केसरकर पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रत्येक वेळी भूमिका मांडणारे यावेळी गप्प का ? अशाप्रकारे जर सत्ताधारी म्हणून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकास निधीबाबत दुजा भाव कोणी दाखवत असेल तर त्याला भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनताच योग्य उत्तर देईल असे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे.













