शेत विहिरीत पडून महिलेचा दुदैवी मृत्यू

दोडामार्ग : झोळंबे येथे शेत जमिनीमध्ये नारळ सुपारी बागेत काम करण्यासाठी गेलेल्या तळकट जोशीवाडी येथील विवाहित महिला मानसी मनोहर देसाई वय वर्षे ३८ या शेत विहिरीच्या ठिकाणी पाणी काढायला गेल्या असता लाकडी रहाट तुटून त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेदहा सुमारास घडली. या बाबत महेश सुरेश देसाई यांनी खबर दिली. अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांनी माहिती देताना सांगितले सदर महिला रविवारी २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजे मानाने झोळंबे येथील शेत जमिनीतील नारळ व फोपळीच्या बागायतीत कामासाठी गेली असता तेथे ती काम करत असताना तिचा तोल जाऊन ती विहिरीच्या पाण्यात पडून बुडून मयत झालेली आहे. या महिलेच्या पश्चात पती तसेच लहान मुले आहेत. तिच्या या अपघाती निधनाबद्दल तळकट गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस गवस करत आहेत.

error: Content is protected !!