मुंबई : जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलारायजेशन झाल्यास वीज बरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा.नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.सह्याद्री अतिथी गृह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1
/
96
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
1
/
96

Subscribe










