मुंबई प्रतिनिधी: हिवाळी पर्यटन हंगामासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना अखेर कोकण रेल्वेने थांबे वाढवले आहेत.या विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेने बुधवारी केली आणि कोकणात या गाड्यांना देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांची बाब कोकण रेल्वे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने रेल्वेला तत्काळ पत्र पाठऊन निदर्शनास आणून दिली. त्यानुसार कोकण रेल्वेने मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला आणखीन तीन थांबे दिले आहेत.या संदर्भात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत ०११५१/०११५२ मुंबई-करमळी हिवाळी विशेष गाड्यांना वीर वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोडयेथे थांबे दिल्याबद्दल अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वेचे आभार मानले आहेत.विशेष गाडीला अपुरे थांबे असल्याचे लक्षात आल्यावर समितीने विनंती केल्यानुसार हे वाढीव थांबे दिल्यामुळे संबंधित तालुक्यांतील प्रवाशाना गर्दीच्या हंगामात दिलासा मिळणार असल्याचे समितीने म्हटले आहे.