गणेश चतुर्थी – श्रद्धा, आनंद आणि पर्यावरणपूरकता

भारतीय संस्कृतीत गणेश चतुर्थीला अपूर्व महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता श्रीगणेशाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी भक्तगण घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करून उत्सव साजरा करतात.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंब व समाज यांना एकत्र आणणारा, बंधुभाव वाढवणारा आणि संस्कार जोपासणारा उत्सव आहे. गोड मोदक, भजनी मंडळे, ढोल-ताशांचा गजर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरत्या यांमुळे वातावरण मंगलमय होते.

तथापि, आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच गणेशोत्सवात काही नियम पाळणे आवश्यक आहे –

  1. शाडूच्या मूर्तींची निवड करावी – पीओपी व रासायनिक रंग टाळावेत.
  2. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवावे – कार्यक्रमांमध्ये आवाजाची मर्यादा पाळावी.
  3. प्लास्टिकचा वापर टाळावा – सजावटीसाठी नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.
  4. घरगुती किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे
  5. स्वच्छता व शिस्त पाळावी – सामूहिक जबाबदारीने उत्सव साजरा करणे हाच खरा गणेशभक्तीचा मार्ग.

श्रीगणेश बुद्धी, विवेक आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देव आहे. म्हणून भक्तीबरोबर जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे.

“गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणेसह आपण जर निसर्गाचे रक्षण केले, तरच हा खऱ्या अर्थाने प्रिय व पूजनीय गणेशोत्सव ठरेल.


लेखक : अथर्व विठोबा राऊळ
(सामाजिक कार्यकर्ता, कुडाळ)

error: Content is protected !!