मालवण किनारपट्टीवर घोंगावलय बाबी जोगी नावाचं वादळ!

मालवण किनारपट्टीचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- बाबी जोगी.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले

गेली कित्येक वर्षे मालवण किनारपट्टीसह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून बाबी जोगी यांना ओळख मिळाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण ‘एका बाजुला’ आणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ‘दुसऱ्या बाजुला’. आणी याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या मालवण या ठिकाणी आपल्या समाजसेवच्या माध्यमातून किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मच्छिमारांना न्याय देणारे नेतृत्व म्हणजे बाबी जोगी.


सागरी हद्दीतील पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सच्या विरोधातील लढा असो किंवा मच्छीमारांना भेडसावणाऱ्या अन्य कोणत्याही समस्या असोत. त्या सोडविण्यासाठी नेहमीच आपले मोठे योगदान देऊन सतर्क व सक्रिय असे नेतृत्व म्हणून बाबी जोगी यांच्याकडे बघितले जाते.माजी आमदार वैभव नाईक यांचा निष्ठावंत मावळा अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.मच्छिमारांना न्याय देण्याबरोबरच गेल्या काही वर्षात राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.


राजकारण हा केवळ व्यवसाय न मानता सर्वसामान्य मच्छिमारांच्या मदतीला धावून जात डोळे पुसणारे व्यक्तिमत्व अशी मालवण किनारपट्टीवर ओळख निर्माण केली आहे.सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी धैर्य आणि दिलदारपणा असलेले एक जहाल रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे बाबी जोगी होय ! एक अलौकिक व्यक्तिमत्व, अगदी पारदर्शक स्वभाव ! मनात एक आणि बाहेर दुसरे असे कधीच नाही. ब-यांशी बरे आणि वाईटांशी वाईट असा बाणेदार स्वभाव!


पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांचा जन्म मालवण तालुक्यातील किनारपट्टी भागातील धुरीवाडा या ठिकाणी सर्वसामान्य मच्छिमार कुंटुबात झाला.बाबी जोगी यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच वडिलांच छत्र गमविले त्यामुळे अल्पवयात त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.त्यांचे आजोबा सदानंद शंकर जोगी हे जुन्या रापण संघाचे प्रमुख होते. रापण मच्छीमार संघासाठी त्यांची असलेली तळमळ पाहून बाबी जोगी यानांही आपल्या पारंपरिक मच्छीमारांसाठी काम करण्याची इच्छा झाली. पुढे ज्येष्ठ मच्छीमार नेते ज्ञानेश देऊलकर सर व नॅशनल फिशवर्कर फोरमचे सदस्य रमेश धुरी यांनी त्यांना बॅ. नाथ पै येथे बोलावून घेत श्रमिक मच्छीमार संघाचे काम करण्याचा सल्ला दिला. संघाचे सभासद बनवून घेत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. ही जबाबदारी घेतल्यानंतर बाबी जोगी यांनी मच्छीमारांच्या अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक केसेसही आपल्यावर घेतल्या. पर्ससीन नेटच्या मासेमारी विरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग होत सरकारला कायद्यात बदल करण्यास भाग पाडले.


मच्छीमारांसाठी काम करत असतानाच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष ते शहराध्यक्ष म्हणून त्यांनी मजल मारली. शहराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षात मालवण पालिकेवर सत्ता मिळविली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, माजी नगरसेवक नितीन वाळके यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांच्या कामाची पक्षश्रेष्ठींनी दखल घेत शिवसेना शहरप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. काही वर्षांपूर्वी शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. यात केवळ शहरप्रमुख हेच पद कायम ठेवण्यात आले होते. त्यावेळी विषय बराच चर्चेत राहिला होता.
चांदा ते बांदा या योजनेतंर्गत पारंपरिक मच्छीमारांना फायदा व्हावा यासाठी बाबी जोगी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ येथील मच्छीमारांना मिळवून दिला. त्यांच्या या कामाची दखल दीपक केसरकर यांनी घेत मालवण पालिकेच्या महोत्सवात मालवणच्या जनतेसमोर आपल्या भाषणात याचा उल्लेख करत त्याला उजाळा दिला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून हाऊस बोट इंजिन, इन्सुलेटेड व्हॅन, रापण संघांना जाळ्या, एम आय इंजिन, फायबर बोट यांसारख्या सुविधा स्थानिक मच्छीमारांना मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.


त्यांनी आपल्या धुरीवाडा-चिवला बीच या भागात किनारी रस्ता, मच्छीमार बांधवांना आराम करण्यासाठी उत्तम दर्जाची निवारा शेड उभारली. त्याचबरोबर दर्जेदार अशी स्वच्छतागृह किनाऱ्याला उभी केली. आपल्या प्रभागात विद्युत केबल मालवण शहरात सर्वप्रथम टाकल्या त्याचप्रमाणे किनाऱ्याला मोठे हायमास्ट दिवे बसवले कमी दाबाच्या समस्येसाठी नवीन ट्रान्सफर बसवून विजेची समस्या सोडवली.अशी बरीचशी कामे त्यांच्या प्रयत्नाने मार्गस्थ त्यांनी केली आहेत.मच्छीमारांसाठी नवीन जेटी बांधल्या कधीही राजकारण न पाहता मदतीसाठी धावून जाणार नेतृत्व म्हणून बाबी जोगी यांना ओळख मिळाली आहे.जिल्ह्यातील मच्छीमारांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मच्छीमारांच कोणतेही काम असो बाबी जोगींना मच्छीमार हक्काने फोन करतात आणि बाबी जोगी ही मच्छीमारांच हक्काने काम करून देतात.


आज जिल्ह्यात बाबी जोगी हे मच्छीमार नेते म्हणून ओळखले जातात. जिल्हा गाबीत समाज जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मत्स्य शेतकरी सहकारी संस्था संचालक, दांडी येथील रामेश्वर सोसायटीचे संचालक तसेच जिल्हा सल्लागार व नियंत्रण समितीत श्रमिक मच्छीमार संघटनेचा प्रतिनिधी म्हणून ते यशस्वी काम करत आहेत. त्यांच्या या यशात आई, पत्नी, बहिणींचे सहकार्य लाभले आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या या वाढदिनी भविष्यातही त्यांचे हे कार्य असेच सुरू राहो अशी आई कुंभादेवी आणि ग्रामदैवत रवळनाथ चरणी प्रार्थना.

आनंद चिरमुले
9403597359

error: Content is protected !!