भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे.
जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांना आपले प्राण गमावले लागले होते. दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संलग्न कॅम्पने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग प्रकर्षाने समोर आला होता. भारतीय सैन्याचे याला चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत २६ निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला आहे. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तलवार हल्ला न चढवल्याचे स्पष्ट केले आहे. हल्ल्याचे स्थळ निवडताना भारतीय सैन्याने कमालीचा संयम दाखवून फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.