100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर

ICDS विभाग ठरला अव्वल

पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम

अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी

ब्युरो न्यूज: राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता.

कोण आहे अव्वल तर कुठल्या विभागला मिळाले काम गुण?

दरम्यान या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. 100 दिवसांच्या कार्यक्रमात महिला व बालविकास खातं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपचे तीन विभाग टाॅप पाचमध्ये आहेत. पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आदिती तटकरेंकडे असलेला महिला व बालविकास आघाडीवर आहे.

कसे झाले गुणांकन?

याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर

उत्कृष्ट कार्य करणारे….

– 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,

– ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,

– ⁠5 जिल्हाधिकारी,

– ⁠5 पोलिस अधीक्षक,

– ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),

– ⁠4 महापालिका आयुक्त,

– ⁠3 पोलिस आयुक्त,

– ⁠2 विभागीय आयुक्त

– ⁠2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक

चंद्रपूर जिल्हाधिकारी अव्वल

सरकारच्या 100 दिवसांत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29 टक्के गुणकोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीयजळगावचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,66.86 टक्के गुण

पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम

पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम 100 दिवसांच्या कामांत पालघर पो.अधीक्षकांना 90.29% गुण नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पो.अधीक्षक द्वितीय स्थानी नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीच्या पो.अधीक्षकांना 80 टक्के गुण जळगावचे पो.अधीक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 64 टक्के गुणांसह पाचवे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विभागात कोण अव्वल?

ढिसाळ कामगिरी करणारे तीन विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणारा अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहे. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नगरविकास विभागाला 34 टक्के मार्क, तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहे.

error: Content is protected !!