रेल्वेने घेतला मोठा निर्णय
मुंबई: अलीकडचे प्रयागराज चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अनेक लोकांना रेल्वे स्थानकावर आपला जीव गमवावा लागला आहे.या गोष्टीचा विचार करता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर (प्लॅटफॉर्मवर) प्रवेश दिला जाणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर हा नियम लागू?
देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नवीन नियम लागू केला जाईल. या नियमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देखील भारतीय रेल्वेने म्हटले आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये जास्त पादचाऱ्यांची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली. बैठकीत जास्त रेल्वे प्रवासींची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली.
या नवीन धोरणाचे उद्दिष्ट
विशेषतःगर्दीच्या हंगामात प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात आणणे हा आहे.देशातील ६० मोठ्या रेल्वे स्थानकांवर हा नियम लागू केला जाईल, ज्यामध्ये देशातील ‘खालील’ स्थानकांचा समावेश आहे. गर्दी नियंत्रणाच्या गरजेनुसार अतिरिक्त स्थानके यादीत समाविष्ट केली जातील, असे देखील रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.
• नवी दिल्ली रेल्वे स्थानक (दिल्ली)
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
• हावडा जंक्शन (कोलकाता)
• चेन्नई सेंट्रल (चेन्नई)
• बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानक (बेंगळुरू)













