माजी आमदार बच्चू कडू यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपली सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवला आहे. पदावर राहून आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी शक्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तींना अद्यापही अनेक गोष्टी मिळत नसल्याने याबद्दल खंत आणि नाराजी त्यांनी व्यक्त केलीय. दिव्यांग कल्याण मंत्रालय हा नवीन विभाग निर्माण करण्यात आला आहे.
