छगन भुजबळ यांना मिळणार राज्यपालाची जबाबदारी?

भाजपाच्या “या”नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी: मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाल्याने महायुती मधे सद्ध्या नेत्यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे.त्यातच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती भाजपा नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याची.भाजपा नेते आशिष देशमुख यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या बाबतीत मोठा दावा केला आहे. आशिष देशमुख म्हणाले, मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्न येत नाही. नवीन सरकार स्थापन झाले आहे. भरघोस आमदार महायुतीकडे आहेत. प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणे गरजेचे होते. म्हणून जुने अनुभवी लोकही त्यात आहेत. नव्या लोकांना अनुभव देण्याच काम सरकारने केले आहे, असंही देशमुख म्हणाले.”यावेळी कोणाला संधी मिळाली नसेल तर त्यामागे दुसऱ्या कोणाला संधी मिळावी हाच एक हेतू आहे. १९८५ पासून भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्याचे विविध विभागाचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. आज अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल. मोठा निर्णय म्हणजे देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे भुजबळ साहेब राज्यपाल होऊ शकतात. त्यांच्या पक्षाने तशी योजना बनवली असेल, असा मोठा गौप्यस्फोट आशिष देशमुख यांनी केला.

error: Content is protected !!