उदय सामंत यांचे खातेवाटपावर सूचक वक्तव्य
मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना प्राध्यान्य मिळाल्याने महायुती मधे नाराजी नाट्य दिसत आहेच .मात्र सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती खाते वाटपासंदर्भात .मंत्रिमंडळ विस्तार होऊन २ दिवस उलटले त्यात हिवाळी अधिवेशन सुद्धा चालू झाले.मात्र त्या खात्याचा मंत्रीच नसेल तर प्रश्न कोणाला विचारावा असा सवाल आता विरोधी पक्ष नेते विचारत आहेत.
दरम्यान यावर आता मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केलं आहे.मंत्रीमंडळ विस्तार होऊन आता दोन दिवस उलटले आहेत तरी अजून खातेवाटपाचा काही पत्ता नाही. त्यात आता शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी महायुतीच्या खातेवाटपावर मोठी अपडेट दिली आहे. खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, येत्या 2 दिवसांत यावर निर्णय होईल असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.उदय सामंत माध्यमांशी बोलत होते. यावेळी महायुतीच्या खातेवाटपावर बोलताना सामंत म्हणाले की, खातेवाटपामध्ये कुठेही तिढा नाही आणि कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही. तीनही नेते एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेतील. तसेच विरोधकांनी खात्याचा मंत्रीच नाही तर आम्ही प्रश्न कुणाला विचारायचा? असा सवाल केला होता, यावर बोलताना सामंत म्हणाले की, या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा त्रास नाही आहे. लक्षवेधी देखील नाही आहे. परंतू महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले विकासात्मक प्रश्न विरोधकांनी विचारले तर त्यांना अभिप्रेत असलेले उत्तर द्यायला सरकार तयार आहे. मंत्रिमंडळाच जरी खातेवाटप झालं नसलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, त्यामुळे लवकरा लवकर खातेवाटप होईल, असे उदय सामंतांनी सांगितले आहे.