अवघ्या दोन महिन्यात दोन अभिनेत्यांचा मृत्यू,तर शूटिंग दरम्यान जहाज कोसळले
शूटिंग आधी घेतला होता देवाचा कौल
ब्युरो न्यूज: दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना घडत आहेत. अभिनेता कलाभवन निजूचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाला होता, त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक बोट उलटली ज्यामध्ये 30 क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे.कांतारा चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे दुसरा भाग बनवत आहेत.
मात्र मे महिन्यापासून शूटिंगदरम्यान अनेक अनुचित घटना घडत आहेत. दोन अभिनेत्यांचा मृत्यू झाला असून आता शूटिंग बोट उलटली आहे. दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या घटनेत अनेक महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.शूटिंगपूर्वी देवाची पूजारामदास पुजारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘दक्षिण कन्नडमधील आत्म्यांवर चित्रपट बनवणे हे धोकादायक आहे. परंतु ऋषभ शेट्टीने या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी देवाची पूजा देखील केली होती आणि त्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी देखील घेतली होती.
अनुचित घटना
१२ जून रोजी अभिनेता कलाभवन निजू यांचे चित्रपटाच्या सेटवर हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले.याआधी मे २०२५ मध्ये अभिनेते राकेश पुजारी यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. राकेश आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेले असताना त्यांना अचानक झटका आला आणि त्यातच त्यांचा प्राण गेला. त्याच महिन्यात, काही दिवसांनी ३२ वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट एम.एफ. कपिल यांचा देखील मृत्यू झाला होता.













