वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का ?

सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे.

गेल्या 30 वर्षातल्या राज्यकर्त्यां कडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

जिल्ह्याच्या जनतेने कुडाळ येथे एमआयडीसीसाठी, चिपी येथे विमानतळासाठी, माणगाव येथे धरण प्रकल्पासाठी अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यात आपल्या जमिनी दिल्या तसेच दोडामार्ग एमआयडीसी व मुंबई गोवा महामार्गासाठी तसेच इतर अनेक प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी देऊन सुद्धा कोणताही प्रकल्प अद्याप पर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. असे असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच लाखो झाडांची कत्तल करून या नवीन शक्तिपीठ महामार्गामुळे येथील जनतेला कितपत फायदा होईल याबाबत साशंकताच आहे. फायदा झालाच तर दीपक केसरकर यांच्या मायनिंग आणि भूमाफियांसारख्या धनदांडग्या मित्रांनाच होईल.जसा मैत्रीसाठी शेतकऱ्यांची जमीन कवडी मोलाने आंदण म्हणून दिलेल्या शिरोडा टाक येथील जमीनीवर 30 वर्षांनी यांच्या मित्रांने पंचतारांकित हॉटेल सुरू केले ज्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायत बांदा यांनी सुद्धा या शक्तिपीठ मार्गास ठाम विरोध दर्शवला आहे.


दोन दिवसांपूर्वी आमदार दिपक केसरकर यांनी त्यांचे मित्र तिमलो यांच्या माध्यमातून तेरा ॲम्बुलन्सचे लोकार्पण केले त्याचे स्वागतच पण 13 ॲम्बुलन्समुळे सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था खरोखरच सुधारणार आहे का याबाबत प्रश्नचिन्हच आहे अशी टिका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!